
अगदी परवाचाच उदाहरण घ्या ना. तुम्हाला सुट्टी लागली म्हणून तुम्ही गावो गावी निघून घेलात. कुणी नुस्ते खेळण्यात रमले. सगळे विसरले अक्कलरावांना. साहजिकच अक्कलरावांनाही कंटाळा आला. मग तेही निघाले फिरायला. पण कुठे जायचं फिरायला ?
विचार करता करता अक्कलरावांनी चक्क जगभर फिरून यायचं ठरवलं. आता जगभर फिरायचं म्हणल्यावर बैलगाडीतून प्रवास करून थोडंच चालणार आहे. सहाजिकच अक्कलरावांनी विमानान प्रवास करायचं ठरवलं. मग अक्कलरावांनी पासपोर्ट काढला, व्हिसा काढला. आणि एक दिवस आपलं चंबू गबाळ घेवून पोहचले विमानतळावर.
थोड्याच वेळात त्यांचं विमान प्ल्याट फॉर्मला लागलं. रेल्वेच्या नाही काही विमानाच्या प्ल्याट फॉर्मला. हो बरोबर सांगितलत तुम्ही " धावपट्टी " म्हणतात त्या प्ल्याट फॉर्मला.
झालं अक्कल राव विमानात बसले. विमानाचं दार लागलं. सूऊऊउ करून विमान हवेत झेपावलं.
अक्कलराव त्यांच्या खुर्चीत रेलले. विमानाच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागले. एवढ्यात एअर होस्टेस आली आणि मग काय काय गंमत झाली पहा बरं. अक्कलरावांना जगभर कशासाठी फिरायचं आहे तेही अक्कलराव एअर होस्टेसला सांगतात.ते ही फरा मजेशीर आहे. हे सारा वाचा या कवितेत -
No comments:
Post a Comment