Saturday, June 19, 2010

पाटी तेवढी खरी वाटते

खरं तर तुमची शाळा सुरु व्हायच्या आधीच हे सारं लिहायचं होतं पण नाही वेळ मिळाला. मला माहिती आहे तुमची शाळा सुरु होऊन आता आठवडा झालाय. पण जे आधी लिहायचं होतं ते आत्ता लिहितो. म्हणतात ना, " एखादी  चांगली गोष्ट कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना पण करावी.

ठीक आहे.

हा तर मग आता सांगा तुमच्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला ?

मजेत गेला असेल ना ?

नवे कपडे..........नवे बूट. नवं दफ्तर.........नव्या वह्या...............नवी पुस्तकं. सारं सारं......नवं कोरं.

मुलांनो या नव्या वह्या पुस्तकांचा कधी वास घेऊन पाहिलात ?

पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा वास आणि नव्या पुस्तकांचा वास दोन्हीही खूप छान असतात. ते तयार करता येत नाही. पण जेव्हा येतात तेव्हा श्वासात भरून घ्यावेसे वाटतात.

काही काही गोष्टी अती झाल्या कि त्यांचा कंटाळा येतो. सुट्टीचही तसंच असतं. मला माहिती आहे तुम्हालाही सुट्टीचा कंटाळा आला असेल. कारण या पुढच्या कवितेतल्या छोट्यालाही सुट्टीचा कंटाळा आलाय म्हणूनच तो म्हणतोय -   

आता झाली सुट्टी पुरे
शाळा मला खरी वाटते
टि. व्ही. नको गेम नको

पाटी तेवढी खरी वाटते

तो छोटू आणखी काय काय म्हणतोय ते ही पहा -

      

No comments: